सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

कोटीतीर्थ मंदिर
या परिसराला कोटीतीर्थ हे नाव का पडले याच्या अनेक दंतकथा आहेत. एका दंतकथेप्रमाणे असुरांनी देवांवर विजय मिळवला असताना महालक्ष्मीने देवांच्या मदतीस धावून जावून एक कोटी असुरांना येथे ठार मारल्याने या जागेला कोटीतीर्थ असे नाव मिळाले. महालक्ष्मीनेच येथे कोटीश्वर लिंगाची स्थापना केली. दुसर्‍या एका कथेप्रमाणे पुष्करेश्वराने करवीरात हे तीर्थ निर्माण केले. या ठिकाणी भानुराजाने आपल्या कोटीजन्मींची पातके घालविली म्हणून याला कोटीतीर्थ किंवा पुष्करतीर्थ असे नाव पडले.

हे तीर्थ पापनाशिनी असल्याचे कल्पून आणि ते सर्व तीर्थात श्रेष्ठ असल्याचे समजून काहीजण कोल्हापुरात आल्यावर प्रथम दर्शन कोटीतीर्थाचे घेतात. येथे पूर्वी महालक्ष्मीचे मंदिर होते पण ते भूकंपात गडप झाल्याचीही समजूत आहे. कोटीतीर्थाजवळील स्वामी समर्थ मंदिर शांत व रमणीय आहे.